Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*

Image
          आज दिनांक 15-08- 2023 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत* या ठिकाणी साजरा करण्यात आला. या प्रसंगी तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या.             ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले *संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर* यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह पार पडला या मध्ये * MBBS * साठी पात्र ठरलेल्या दोन जुळ्या बहिणी * ग्रीष्मा गौतम गायकवाड * व * मयुरी गौतम गायकवाड* यांचा सत्कार करण्यात आला.         हा तीन दिवसीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य जाधव वैजनाथ, उप प्राचार्य पातेकर संदीप, प्रा.साळवे प्रकाश, प्रा.लोखंडे श्रीधर, प्रा.लोखंडे सचिन, प्रा.नाल्टे आशिष, प्रा.धोंडी सचिन, प्रा.शेळके सुदर्शन, प्रा.श्रीमती देलमा...

श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संदीप फुलवरे ची भारतीय सैन्यात निवड

Image
*🌹अभिनंदन.अभिनंदन🌹*  ==================== *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संदीप फुलवरे ची भारतीय सैन्यात निवड....* ==================== *वसमत :- श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संदीप मारुती फुलवरे याची भारतीय सैन्यात भरती झाल्याने आज श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत तर्फे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश कमळू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.* यावेळी श्री अरुण कमळू,श्री राजेंद्र धावणे उपस्थित होते. संदीप फुलवरे हा विद्यार्थी ने अत्यंत मेहनत करून त्यांने आपले शिक्षण पूर्ण केले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती त्याचे वडील हे गवंडी काम करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचे पालन पोषण व मुलांचे शिक्षण यातून ते करायचे त्यामुळे संदीप सुद्धा वडिलांना हातभार लावायचा व शिक्षणाकडे सुद्धा विशेष लक्ष द्यायचा. लहानपणापासून त्याला सैन्यात भरती व्हावं असं मनोमन वाटायचं परंतु परिस्थितीमुळे अडचणी समोर यायच्या पण तो परिस्थितीचे कधीही रडगाणे गात नव्हता त्याने प्रत्येक परिस्थीतीवर मात करायची असे त...

*श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालया च्या जुळ्या बहिणी ची MBBS साठी निवड...*

Image
                                       *🌹अभिनंदन🌹*                          *🌹अभिनंदन🌹* ================================== ==================== वसमत :- वसमत येथील सुप्रसिद्ध  व उत्कृष्ट निकालाची परंपरा देणारे महाविद्यालय म्हणजे *कमळू यांचे श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय (कला वाणिज्य व विज्ञान)* या आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जुळ्या बहिणी *ग्रीष्मा गौतम गायकवाड व मयुरी गौतम गायकवाड यांची MBBS साठी शासकीय महाविद्यालय परभणी व धुळे या ठिकाणी निवड झाली आहे.* *MBBS साठी निवड झाल्या बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश सावजी कमळू, सौ.आरती कमळू,अरुण कमळू,गौरव कमळू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे* तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव व्ही,उपप्राचार्य पातेकर एस,प्रा.लोखंडे एस,प्रा.साळवे पी,प्रा देलमाडे मॅडम,प्रा.हुमेरा मॅडम,प्रा.लोखंडे एस,प्रा नालटे प्रा.धोंडी एस,प्रा.शेळके सारंग ...

"पालक व मुले यांची शिक्षणाविषयीची मानसिकता"

    "असं शिक्षण शिक्षण       जसं वाघीणीचं दूध       इथं नाही उच्च नीच      किती भाग्याचं लक्षण "     ह्या ओळीच्या आधारावर आज समाजात शिक्षणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे.शिक्षणाची क्रांती झाली पाहिजे,असे प्रत्येकाला वाटत असते.शिक्षणामुळे माणसाची प्रगती वाढत चाललेली दिसून येते.भारतीय समाज व्यवस्थेत शिक्षणामुळे परिवर्तन झालेले आढळून येत आहे,परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.शिक्षणामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.शिक्षण हे माणसाला अंधारातून प्रकाशात घेऊन जाते.कोणत्याही व्यक्तीला जर शिक्षण नसेल तर डोळे असून आंधळा.आजच्या विज्ञानाच्या युगात शिक्षण नसेल तर व्यक्तीला महत्त्व नाही,अशी काही पालकांची भूमिका दिसून येते.शिक्षण हे आजच्या काळातील गरज बनली आहे.शिक्षण नसेल तर समाजात मान प्रतिष्ठा मिळत नाही.सामाजिक,राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक प्रगती ही शिक्षणाशिवाय नाही असे प्रत्येक पालकांना वाटत असते.     आज झपाटयाने दिवसेंदिवस शिक्षण वाढत आहे.पण व्यक्ती हा जागीच आहे.आज प्रत्येक पालकांचे एक स्वप्...

12 वी बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी - श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत

Image
Image
 *🌹निवड व अभिनंदन🌹* =================== *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महविद्यालयाचा विद्यार्थी नितीन नामदेव जोगदंड यांची DRDO च्या एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन....* ==================== वसमत :- *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय,वसमत या महाविद्यालयाचा विद्यार्थी नितीन नामदेव जोगदंड रा.नागसेन नगर वसमत जि.हिंगोली यांचे भारतातुन सहाव्या क्रमांकाने व महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकाने DRDO रक्षा मंत्रालय भारत सरकार आवडी चेन्नई  येथे पहिल्यांच प्रयत्नात ट्रेनिंग साठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.* चैन्नई येथे DRDO (CVRDE) लढाकू वाहन अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठान (रक्षा मंत्रालय, भारत सरकार )यांच्या आवडी चेन्नैई येथील Research centre मध्ये देशभरातून 35 प्रशिक्षणार्थी (Training) साठी एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी Select झाले असून 35 जागेसाठी भारतातुन एक लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.या प्रशिक्षणासाठी अत्यंत कठिण असणार्या परिक्षा मध्ये यश संपादन करणे खुप कठीण असते. यामध्ये महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकाने व भारतातुन सहाव्या क्रमांकाने उ...
Image
  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले January 04, 2023 भारतीय समाज हा रुढी प्रथा परंपरा अंधश्रद्धा चालीरीती अज्ञान अशा जुन्या विचारांनी बुरसटलेला होता.भारतीय समाजामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिले जायचे तिचे अस्तित्व चूल आणि मूल एवढ्या पुरतेच मर्यादित होते. भारतीय समाजामध्ये कुठल्याही धर्मातील स्त्रीने जर शिक्षण घेतले तर धर्म बुडतो. जग हे नष्ट होते अशा त्यांची धारणा होती. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्था होती. अस्पृश्यता होती बालविवाह बालहत्या केशवपण पद्धती सतीप्रथा होती. पेशवाईच्‍या काळात महिला या अबला म्हणून समजल्या जात पण आज त्या सबला बनल्या आहेत. महिलेचे अस्तित्व चुलीपुरतेच मर्यादित राहिलेले नाही ती अस्तित्व गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलेले दिसून येते ते केवळ एका स्त्री मुळेच म्हणजे सावित्रीबाई मुळेच म्हणावे लागेल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते 1840 मध्ये वयाच्या अवघ्या नव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला तेव्हा ...